महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (एमयूएचएस)
महाराष्ट्र राज्यामध्ये, आधुनिक वैद्यक व भारतीय वैद्यक पध्दती यामध्ये यथायोग्य आणि पद्धतशीर शिक्षण, अध्यापन, प्रशिक्षण व संशोधन होत आहे. हे सुनिश्चित करण्याच्या प्रयोजनाकरिता एका स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना करणे व ते विधीसंस्थापित करणे आणि राज्यात वैद्यक शास्त्रांत विकास साधणे, तसेच वैद्यक शाखांतील विविध अभ्यासक्रमांत एकरुपता आणणे यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, १९९८ अन्वये आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. विद्यापीठाचे मुख्यालय नाशिक येथे असून मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, लातूर येथे विभागीय केंद्रांची स्थापना विद्यापीठाने केलेली आहे. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून जवळजवळ ४२५ महाविद्यालये संलग्नित आहेत.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, १९९८ अन्वये महाराष्ट्राचे मा.राज्यपाल हे विद्यापीठाचे कुलपती आहेत व महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हे विद्यापीठाचे प्रती-कुलपती आहेत.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, १९९८ अन्वये विद्यापीठाचे इतर अधिकारी पुढील प्रमाणे आहेत.
१. कुलगुरु
२. प्रती-कुलगुरु
३. विद्याशाखांचे अधिष्ठाते
४. कुलसचिव
५. परीक्षा नियंत्रक
६. वित्त व लेखाधिकारी
७. परिनियमांद्वारे विद्यापीठाचे अधिकारी म्हणून विहीत करण्यात येतील, असे विद्यापीठाच्या सेवेतील इतर अधिकारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास एकूण २३८ पदे शासनाने मंजूर केलेली आहेत व पदांना सातवा वेतन विज्ञान विद्यापीठ अधिनियम, १९९८ अन्वये विद्यापीठाची खालील उदिष्टे आहेत.
- ज्ञानाची निर्मिती, जपवणूक व प्रसार करण्याची आपली जबाबदारी अपार पाडणे.
- शिस्त आणि बौध्दिक जिज्ञासा यात वाढ करणे आणि सर्वोच्च गुणवत्ता साध्य करणे.
- सहिष्णुता व परस्पर सामंजस्याच्या वातावरणात एकविधता व बहुविधता यांस प्रोत्साहन देणे.
- भारताचे संविधानामध्ये नमूद केलेले स्वातंत्र्य, निधर्मवाद, क्षमता व सामाजिक न्याय यांचा प्रसार करणे व सर्वातम मूलतत्वे व मूल्ये यांची राष्ट्रीय विकासाच्या दृष्टीने जोपासना करुन सामाजिक आर्थिक परिवर्तनामध्ये प्रेरक शक्ती म्हणून कार्य करणे.
- विद्यापीठाने स्थानिक व प्रादेशिक विकासाच्या सामंजस्यांमध्ये जवळून सहभागी होऊन ज्ञान व कौशल्य याचा लाभ व्यक्तीविकासाठी व समाजविकासासाठी उपलब्ध करुन देणे.
- एक सजग व वस्तुनिष्ठ समिक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडणे, व्यक्ती व्यक्तीमधील प्रज्ञेचा शोध घेऊन तिची जोपासना करणे, जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये योग्य नेतृत्व तयार करणे व योग्य दृष्टीकोन, आवडी व मूल्ये विकसित करण्याच्या कामी नवीन पिढीला सहाय्य करणे.
- सर्वाना आरोग्य विज्ञानविषयक शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करुन देणे
- कार्यक्षम व संवेदनशील प्रशासन, शास्त्रशुध्द व्यवस्थापन यांची तरतूद करणे व अध्यापन व संशोधन संघटना विकास करणे.
- वेगाने विकास व परिवर्तन होणा¬ऱ्या समाजात ज्ञान संपादनास चालना देणे व बुध्दीजीवी योग्य अशी आधुनिक प्रसारामाध्यमे व तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने उच्च शिक्षणाचे जाळे निर्माण करुन मानवी कतृत्वाच्या सर्व क्षेत्रांमधील नवनवीन कल्पना, संशोधन व शोध यांच्या संदर्भात विद्या, प्रशिक्षण व कौशल्य यांचा दर्जा वाढविण्याच्या संधी सातत्याने उपलब्ध करुन देणे.
- विद्यार्थ्यांशी संबंधित असलेल्या सर्व विद्याविषयक व इतर संबंधित बाबींच्या संबंधात एकमेव मार्गदर्शक निकष म्हणून स्पर्धात्मक गुणवत्ता व श्रेष्ठत्व वाढीस लावण्याचे प्रयत्न करणे.
- प्रत्येक व्यक्तीचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्य साध्य करण्यासाठी शिक्षण व प्रशिक्षण देणे.
- आंतर-ज्ञानशाखा अभ्यास व सहयोगामार्फत सलोखा निर्माण करणे
- निरोगी व्यक्तीचे आरोग्य कायम राखण्यासाठी व रुग्ण व्यक्तीच्या रोग बरा करण्यासाठी भारतीय वैद्यकपध्दती सुरु करणे व विकसीत करणे.